Home राजकारण “राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची सुरुवात!”

“राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची सुरुवात!”

by gauravsalunkhe00@gmail.com
0 comments

राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागचं राजकारण

भाजपासाठी धोका की आव्हान?

आगामी निवडणुकीवर परिणाम होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण

लेखक: विशेष प्रतिनिधी | दिनांक: १९ एप्रिल २०२५

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वळण बिंदू येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन मराठी नेतृत्त्व एकत्र येण्याच्या चर्चांनी सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एकजूट केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही मोठा प्रभाव पाडू शकते.

मराठी मतदारांसाठी नवा पर्याय?

गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमधील संबंध सौहार्दपूर्ण होत असल्याचं चित्र दिसत आहे. काही कार्यक्रमांमध्ये दोघांचे प्रतिनिधी एकत्र दिसले, तर काही बॅकडोअर मिटिंग्सचे संकेतही मिळाले आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मराठी मतदारांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सावधपणे वाटचाल सुरू आहे.

राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात जी अस्थिरता निर्माण झाली, ती अद्याप पूर्णपणे मिटलेली नाही.
राज ठाकरे यांनी यापूर्वी स्वतंत्र भूमिका घेतली होती, तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून सरकार चालवलं.
मात्र आता भाजपाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर दोघांची युती म्हणजे मराठी अस्मितेचं नव्याने एकत्र येणं असे समीकरण रचले जात आहे.

राज ठाकरे यांचे सूचक विधान

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? हे महाराष्ट्राचं स्वप्न आहे.” यावर राज ठाकरे यांनी उत्तर देताना सांगितले, “आमची भांडणं शुल्लक आहेत, परंतु महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि त्याचं भविष्य प्राधान्य असायला हवं.” यावरून राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट झाली की, त्यांनी आपल्या मतभेदांना बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची शक्यता नाकारली नाही.

उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एका भाषणात बोलताना म्हटलं, “आम्ही सगळ्यांशी बोलायला तयार आहोत, पण आमची भूमिका स्पष्ट आहे – देशातील लोकशाही आणि संविधान वाचवणे हेच ध्येय.”
त्यांनी अधिक स्पष्ट करताना पुढे म्हटलं, “माझ्या कडून काही भांडणे न्हवती पण मिटवून टाकली चला, महाराष्ट्राच्या हितासाठी आता एकत्र येण्याचे आवाहन करतो”
या विधानातून त्यांच्या मनातील सकारात्मकता स्पष्टपणे दिसून येते.

भाजपासाठी धोक्याची घंटा?

जर राज-उद्धव एकत्र आले, तर ही युती भाजपासाठी निश्चितच मोठं आव्हान ठरू शकते. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोकण परिसरात दोघांचाही मजबूत जनाधार आहे.
मराठी मतांची विभागणी टळल्यास, आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला प्रत्यक्ष नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे हि वाचावे

“मोठी घोषणा: अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार योजना सुरू – आता हॉस्पिटल खर्चाची चिंता नाही!”

सोशल मीडियावर ट्रेंडिंग चर्चेला उधाण

#राजउद्धवयुती आणि #मराठीएकत्र हे हॅशटॅग्स सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
नेटिझन्सचा मोठा वर्ग या युतीसाठी सकारात्मक दिसतो आहे, तर काहींनी याला “राजकीय खेळी” म्हणत सावध प्रतिक्रिया दिली आहे.ही मुलाखत आणि त्यातील विधान सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली आहेत. ट्विटर, फेसबुक, आणि यूट्यूबवर #राजउद्धवयुती, #मराठीएकता आणि #MaharashtraPolitics हे हॅशटॅग ट्रेंडिंगला लागले आहेत. अनेकांनी याला “मराठी मनांचं एकत्रीकरण” असं संबोधलं आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते तरुणांपर्यंत अनेकांनी या संभाव्य युतीला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावरून स्पष्ट होतं की, “राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र” या कल्पनेमागे एक जनभावना आहे, जी भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकते.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

राजकीय विश्लेषक डॉ. मणिकांत देशमुख म्हणतात, “ही युती प्रत्यक्षात आली, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण ठरू शकते. मात्र नेतृत्वाचा प्रश्न, आणि दोघांच्या भूतकाळातील मतभेद, हे युतीला अडथळा ठरू शकतात.”

मनसे आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा नवा विषय

ही चर्चा सुरू झाल्यानंतर मनसे व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर याला पाठिंबा दर्शवला असून, “आता वेळ आली आहे एकत्र येण्याची,” अशा भावना व्यक्त होत आहेत. दोन्ही पक्षांतील काही ज्येष्ठ कार्यकर्ते देखील बंद दरवाजामागे यासाठी हालचाली करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे “राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र” ही फक्त कल्पना न राहता, ती प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने छोटेसे पाऊल पडतंय का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Election Commission of India – Political Party Details:

महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार का?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे केवळ एक राजकीय युती नव्हे, तर मराठी अस्मितेच्या नव्या युगाची सुरुवात असू शकते.
ही युती प्रत्यक्षात आली, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम मिळेल, आणि अनेकांचे राजकीय गणितं बदलतील, हे निश्चित.

Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

You may also like

Leave a Comment