प्रभाग क्रमांक ११ मध्ये घरकुलवासीयांचा निर्णायक कौल; भाजप पॅनलच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
“पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, आणि पंधरा तारखेनंतर आम्ही संपूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू,” असे स्पष्ट व ठाम शब्दांत आवाहन सामाजिक कार्यकर्ते व लोकनेते निलेश नेवाळे यांनी केले.
प्रभागातील विविध भागांत सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आजपर्यंत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. पाणी, रस्ते, घरकुल, आरोग्य, स्वच्छता अशा मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे,” असे नेवाळे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “ही लढाई माझी वैयक्तिक नसून सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आहे. पंधरा तारखेपर्यंत जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळाला, तर पंधरा तारखेनंतर प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी मी ढाल बनून उभा राहीन.”
या निवडणुकीत भाजपकडून कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, रिटा सानप आणि निलेश नेवाळे हे भाजपचे अधिकृत उमेदवार एकत्रित पॅनल म्हणून मैदानात उतरले आहेत. चौघेही उमेदवार प्रभागातील घरकुल, झोपडपट्टी तसेच सोसायटी परिसरात प्रत्यक्ष भेटी, पदयात्रा आणि संवाद बैठकींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
या एकसंघ आणि आक्रमक प्रचाराला घरकुल परिसरासह सोसायट्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत असून, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. “बोलघेवडे नेते नकोत, तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व हवे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. पॅनलच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे आणि जमिनीवर दिसणाऱ्या कामामुळे नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
निलेश नेवाळे आणि भाजप पॅनलच्या या ठाम भूमिकेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून, येणाऱ्या दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

