पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा निवडणूक रणशिंग फुंकला
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल.
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, भारतीय जनता पार्टीने शहरात जोरदार प्रचाराची सुरुवात केली आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प परिसरात आयोजित कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीकेची झोड उठवली.
“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका!” असा स्पष्ट इशारा देत रविंद्र चव्हाण इशारा अजित पवार हा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
चव्हाण म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतीच झालेली पत्रकार परिषद ही स्क्रिप्टेड होती. एजन्सींच्या सल्ल्याने बिनबुडाचे आरोप करण्यात आले. “त्यांच्या सत्ताकाळात शहरात काय झाले आणि भाजपाच्या काळात कोणती विकासकामे झाली, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे स्क्रिप्टवर बोलण्याऐवजी वास्तव मांडावे,” असा टोलाही त्यांनी लगावला. रविंद्र चव्हाण इशारा अजित पवार या वक्तव्यामुळे निवडणूक प्रचाराला धार चढली आहे.
भाजपाने या कार्यक्रमातून अधिकृतपणे महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, महामंत्री राजेश पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने भाजपाचे संघटन आणखी मजबूत झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
चव्हाण पुढे म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता कायम जनतेच्या सेवेत असतो. सेवा आणि संघटन या दोन आधारस्तंभांवर पक्ष काम करतो. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने लोकहिताचे निर्णय घेतल्यामुळेच भाजपाला सातत्याने जनतेचा पाठिंबा मिळत आहे. मात्र, काही लोक मुद्दाम खोटा नॅरेटिव्ह तयार करून महापालिका निवडणुकीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. रविंद्र चव्हाण इशारा अजित पवार या संदर्भात त्यांनी ट्रोल आर्मी आणि एजन्सी संस्कृतीवरही टीका केली.
“पैसे देऊन ट्रोलिंग करणे, बनावट लोकप्रियता दाखवणे हा लोकशाहीचा अपमान आहे. पिंपरी-चिंचवडकर सुज्ञ आहेत. ते विकास पाहतात, स्क्रिप्ट नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, वाहतूक कोंडीमुक्त शहर, मजबूत पायाभूत सुविधा हे भाजपाचे प्राधान्य असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रतिक्रिया देताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, भाजपाची विचारधारा ‘राष्ट्र प्रथम’ ही आहे. हिंदुत्वाबाबत बोलण्याची ताकद आणि भूमिका भाजपाकडेच आहे. “हिंदुत्वाचं नाव घ्यायला अंगात रग लागते,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. एकूणच रविंद्र चव्हाण इशारा अजित पवार या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2026 अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

